मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
एकता मंगल कार्यालय काळी दौलत येथे संपन्न झाला. दिवसे दिवस उशिरा लग्न लागण्याचे प्रमाण वाढत असून एकदा का तरुणांनी डी.जे.वर ठेका धरलाय की तिथी नुसार होणारे लग्न तब्बल तीन तीन तास उशिरा होत आहे.त्या मुळे काही पाहुणे मंडळी लग्न न लावता आल्या पावली परत जात आहे .समाजातील या परंपरेला मोडीत काढून मोहन चव्हाण यांनी तिथी नुसार 12.36 मिनिटांनी होणाऱ्या लग्नात अगदी अर्धा तास पहिले नवरी व नवरदेव यांना बोहल्यावर चढविले व तिथी नुसार वेळेची वाट बघत होते.सर्व पाहुणे मंडळी कडून मोहन चव्हाण यांची प्रशंसा होत असून जिव्हाळा कला संच चे प्रसिद्ध गायक सुनिल चव्हाण यांच्या हस्ते मोहन चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.समाज बांधवांनी मोहन चव्हाण यांचा आदर्श घ्यावा .या वेळी आमदार निलय नाईक मा.आमदार उत्तमराव इंगळे .श्री. दौलत नाईक व बरीच पाहुणे मंडळी हजर होती.
