मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
श्री. क्षेत्र पोहरादेवी येथे श्रीराम नवमी यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत यात्रेच्या नियोजनासंबंधी मार्गदर्शन केले. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शनासाठी बॅरिकेड्स, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, वाहनतळ, आरोग्य पथके तसेच पूजेच्या साहित्याच्या विक्रीसाठी स्टॉल्स यांचे नियोजन कसे असावे यावर चर्चा झाली.तसेच, भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. सदर यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील तीन लाखांहून अधिक भाविक दरवर्षी हजेरी लावतात. त्यामुळे स्वच्छ यात्रा, सुंदर यात्रा आणि शुद्ध यात्रा हे ब्रीद जोपासण्याबाबत निर्देश दिले. या बैठकीला वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, महंत श्री. सुनील महाराज, श्री. शेखर महाराज, संत श्री सेवालाल महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. गोपाल महाराज, पोहरादेवी मंदिराचे महंत भक्तराज महाराज, श्री. जितेंद्र महाराज, विश्व हिंदू परिषदेचे श्री. राजेश्वर निवल तसेच जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
