मुख्य संपादक सुर्यकांत राठोड. सहसंपादक सिद्धार्थ कदम
जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जागतिक जल दिनाचे औचित्य साधून मृद व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी मृद व जलसंधारण विभाग तसेच भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले उद्घाटन मा.ना. संजय राठोड,मंत्री मृद व जलसंधारण यांनी केले.राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पाणीदार महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मृद व जलसंधारण विभागाने उचलले आहे.राज्याचा मृद व जलसंधारण विभाग आणि महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था,ग्रामपंचायती संयुक्तपणे यासाठी काम करणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील धरणांमधून गाळ काढून तो शेतीच्या पुनर्वापरासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक सुपीक माती मिळेल.परिणामी, ही योजना शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरणार आहे.सामाजिक कार्यात नेहमीच एक पाऊल पुढे असणारी भारतीय जैन संघटनेचे तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे देखील हे पोर्टल बनवण्यात पुढाकार घेतल्या बद्दल ना.संजय राठोड यांनी त्यांचे अभिनंदन केले व धन्यवाद मानले.राज्यातील NGO तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या महाराष्ट्राला पाणीदार बनविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन ना.संजय राठोड यांनी केले या उद्घाटनप्रसंगी मृद जलसंधान मंत्री संजय राठोड,मृद व जलसंधारण विभागाचे सचिव श्री. गणेश पाटील, यवतमाळ जिल्हाधिकारी श्री. विकास मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मंदार पत्की, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतीलाल मुथ्था, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नंदकिशोर साखला तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि मृद व जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी तथा जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व प्रशासकीय अधिकारी,भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
