मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद वरून हिंगोली कडे निघालेल्या एसटी बसचा चढावरील वळण पार न झाल्याने अपघात घडला. मात्र यात प्रवासी थोडक्यात बचावले. सदर बस ही रस्त्यावरून मागे येत असतांना अचानक रस्त्याच्या कडेला पलटी होतांना थोडक्यात बचावली. सदर बस मध्ये 40 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. तापमानाचा परा जास्त असल्याने इंजन तापल्यामुळे गाडी चढावरील वळणावर थांबली. गाडी मागे घेत असताना हा अपघात घडल्याचे चालकाचे म्हणणे आहे. प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर बस मध्ये हिंगोलीसाठी पाठविण्यात आले आहे.
